नाशिक
प्रसावना
नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून १३०० ते २००० फूट उंचीवर वसला आहे. पश्चिमेकडील डांग भागांत बरेच पर्वत असून यांवर फक्त खरीप पिकें येणें शक्य आहे. पूर्वेकडील `देश’ भाग मात्र सुपीक असून मोकळा आहे. सातमाळ किंवा चांदवड पहाडावरून दोन्ही बाजूंनां वहाणार्या, पूर्वेस गोदावरी व पश्चिमेस गिरणा दोन नद्या या आहेत. सर्वांत उंच शिखर धोडप (४७४१ फूट). इतर बरींच ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचीं लहान लहान शिखरें आहेत. दिंडोरी व नाशिकमध्यें एक लहान पर्वत आहे; यावरच चांभारलेणीं आहेत. गोदावरी ही मोठी नदी असून हिला मिळणार्या नद्या दारणा, कादवा व गिरणा वगैरे आहेत. गिरणा नदी शेतीस फार उपयोगी असून तिला अनेक धरणें बांधिलीं आहेत. या जिल्ह्यांत किल्ले बरेच असून मराठ्यांशी लढाई झालेली अशी बरींच ठिकाणें यांत आहेत. येथील हवा फार चांगली आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत समुद्राकडील वार्यामुळें हवा समशीतोष्ण असते.
उत्तरेला- धुळे जिल्हा, पूर्वेला- जळगाव जिल्हा, अग्नेयेला - औरंगाबाद जिल्हा, दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा, नैऋत्येला - ठाणे जिल्हा, पश्चिमेला - नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा, वायव्येला- डांग जिल्हा
१ सटाणा २ सुरगाणा ३ मालेगाव ४ देवळा ५ पेठ ६ दिंडोरी ७ चांदवड ८ नांदगाव ९ नाशिक १० निफाड ११ येवला १२ इगतपुरी १३ सिन्नर, १४ कळवण १५ त्र्यंबकेश्वर
सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे.
तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते.नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात.
भौगोलिक वैशिष्टये
जिल्हयाचा काही भाग गिरणा तर काही भाग गोदावरी नदीच्या खो-यात आहे. नांदगाव, कळवण, बागलाण या तालुक्यांचा उत्तर व ईशान्य भाग गिरण्या व तिच्या उपनद्यांच्या खो-यांमध्ये आहे. नाशिक निफाड हे तहसिल गोदावरी परिसरात वसलेले आहे. जिल्हयाचा उर्वरित भाग वैतरणा व दारणा नद्यांच्या खो-यात आहे.
उत्तर व दक्षिण पसरलेल्या सहयाद्री पर्वतांच्या रांगांनी जिल्हयाचा पश्चिम भाग व्यावला असून, इगतपूरी, पेठ, सुरगाणा हे तालुके पूर्णतः आणि कळवण, नाशिक व बागलाण या तालुक्यांचा पश्चिम भाग यात समाविष्ट आहे. सहयाद्री पर्वताच्या पूर्वेकडे सेलवारी या टेकडीने नाशिक व धुळे जिल्हयाची सरहद्ध निश्चित केली आहे.
गोदावरी व गिरणा या नाशिक जिल्हयाच्या मुख्य दोन नद्या असून, या व्यतिरीक्त वैतरणा, मोसम, दारणा, मन्याड आणि कादवा या महत्वाच्या नद्या आहेत. जिल्हयात गोदावरी व गिरणा या नद्या बारमाही वाहतात. या नद्यांमुळे त्यांच्या खो-यातील प्रदेश अत्यंत सुपिक झाला आहे.
जिल्हयात मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळयात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सीअसपर्यंत असते.जून महिन्याचे मध्यापासून पावसास सुरवात होउन ऑक्टोबरच्या मध्यात पावसाळा संपतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रवारी या काळात थंडी असते. २००० या वर्षात कमाल तापमान ४१.९ सेल्सीअस तर किमान तापमान ८.०७ सेल्सीअस होते. यावरून जिल्हयाचे हवामान विषम आहे हे स्पष्ट होते.
अलीकडील काळात धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा एक अग्रगण्य ‘औद्योगिक जिल्हा’ होवू पाहात आहे !
Post a Comment