एस. एम. जोशी (१९०४- १९८९)
श्रीधर महादेव जोशी यांनी पुण्यातील पर्वती देवस्थानात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून १९२९ मध्ये सत्याग्रह केला. काँग्रेस समाजवादी पक्ष व राष्ट्र सेवा दल या संघटनेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण सहभाग. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी त्यांनी अखंड प्रयत्न केले. ते अभ्यासु संसद सदस्य, निःस्पृह कामगार नेते, लढाऊ पत्रकार म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी काही काळ, लोकमित्र हे दैनिक चालविले. आगळी वेगळी माणसे हे आठवणीवरील पुस्तक तसेच मी एस. एम्. हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले.
Post a Comment